‘बंगळुरू’ आयपीएलचा नवा चॅम्पियन


विराट कोहलीची स्वप्नपूर्ती! 18 वर्षांनी ट्रॉफीवर नाव कोरले

Advertisement

अहमदाबाद
शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने IPL 2025 चं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीचं नाव आयपीएलच्या विजेत्यांच्या ट्रॉफीवर कोरलं गेलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनेक अपयश पाहिलेल्या या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज यंदा फायनलमध्ये पोहोचून विजेतेपदाच्या खूप जवळ आला होता. मात्र अंतिम क्षणी RCB ने केलेल्या उत्कृष्ट खेळीने पंजाबचं स्वप्न भंगलं.
विराट कोहलीसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. आयपीएलमध्ये अनेक वैयक्तिक विक्रम गाठणाऱ्या या दिग्गज खेळाडूचं संघाला चॅम्पियन बनवण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCB ने याआधी अनेकदा प्लेऑफ आणि फायनल गाठल्या होत्या, पण ट्रॉफी नेहमी हुलकावणी देत होती. यंदा मात्र रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने सर्व बॅटिंग-बोलिंग डिपार्टमेंटमध्ये समतोल कामगिरी करत अखेरच्या क्षणी बाजी मारली.
या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काइल जेमिसनने फिल साल्टला आऊट करून पंजाबचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले, साल्ट 16 धावा करून बाद झाला, तर संघाकडून विराट कोहलीने 43 धावा केल्या, मयंक अग्रवालने 17 चेंडूत 24 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि एक षटकार होता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या 19 धावा करताना 4 विकेट गमावल्या, तर शेवटच्या 5 षटकात 58 धावा करताना 5 विकेट गमावल्या. आरसीबीचा स्कोअर 5 विकेटवर 171 धावा होता, तर डाव संपला तेव्हा 9 विकेटवर 190 धावा होत्या. दरम्यान, जितेश शर्मा (24), रोमारियो शेफर्ड (17), कृणाल पंड्या (4) आणि भुवनेश्वर कुमार (1)आऊट झाले.
पंजाब किंग्जकडून काइल जेमिसन आणि अर्शदीप सिंगने 3-3 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग देखील महागडा ठरला. त्याने 4 षटकात 40 धावा दिल्या, तर अझमतुल्लाहने 4 षटकात 35 धावा दिल्या आणि विराट कोहलीच्या रूपात मोठी विकेट घेतली. विजय कुमारने 4 षटकांत 30 धावा देत एक विकेट घेतली आणि युजवेंद्र चहलने 4 षटकांत 37 धावा देत 1 विकेट घेतली.
191 धावांच्या डोंगरासारख्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पंजाब किंग्जच्या संघाने नाबाद प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगसह चांगली सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 5 षटकांत 43 धावा जोडल्या. पण रणनीतीनुसार टाकलेल्या चेंडूवर जोश हेझलवूडने प्रियांशला आऊट केले. फिल सॉल्टने डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीवर एक अद्भुत झेल घेतला. त्याने प्रथम चेंडू पकडला, परंतु जेव्हा तो बाउंड्रीच्या बाहेर जाऊ लागला, तेव्हा त्याने चेंडू आत फेकला आणि परत कॅच केला. अशाप्रकारे, प्रियांश आर्य 24 धावांवर आऊट झाला. त्याने 19 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार मारले.
प्रभसिमरन सिंग 26 धावांवर बाद झाला. त्याला कृणाल पांड्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, जेव्हा कर्णधार श्रेयस अय्यरला जितेश शर्माने फक्त एका धावेवर रोमारियो शेफर्डने झेलबाद केले, तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये पसरलेले आरसीबी चाहते आनंदाने फुलले. विराट कोहलीचा आक्रमक सेलिब्रेशन पाहण्यासारखा होता. अय्यर हा मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर-2 चा हिरो होता. तो काय करू शकतो हे सर्वांना माहित होते. तो बाद झाल्यावर पंजाबच्या कॅम्पमध्ये शांतता होती.
अशाप्रकारे, दुसरी विकेट 72 धावांवर पडली, तर तिसरी विकेट 79 धावांवर पडली. यानंतर, फलंदाज त्यांच्या विकेट गमावून येत-जात राहिले. शशांक सिंगने निश्चितच अर्धशतक झळकावले असले तरी संघ विजयापासून फक्त 6 धावा दूर राहिला. त्यांनी 7 विकेटसाठी 184 धावा केल्या, तर भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!