स्पर्धात्मक जगाला घाबरून २ मुलांची हत्या
पित्यानेही केली आत्महत्या
मुंबई
ओएनजीसी कर्मचाऱ्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलांना पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून ठार केले. यानंतर त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे मुलांच्या अभ्यासात खराब कामगिरीचा राग आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेवेळी त्या व्यक्तीची पत्नी घरात उपस्थित नव्हती. घरी पोहोचल्यावर तिला पतीचा मृतदेह बेडरूमच्या पंख्याला लटकलेला दिसला. त्याचवेळी दोन्ही मुलांचे मृतदेह बादलीजवळ पडलेले होते. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त केली आहे. फॉरेन्सिक पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यांनी घटनास्थळाचा तपास सुरू केला आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय व्ही चंद्र किशोर काकीनाडा येथील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये कर्मचारी आहेत. त्यांच्या मुलांची अभ्यासातील कामगिरी सुमार होती. यामुळे तो घाबरला होता. अभ्यासात चांगली कामगिरी केली नाही तर स्पर्धात्मक जगात संघर्ष आणि त्रास सहन करावा लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या कारणास्तव त्यांनी हे पाऊल उचलले.

