बुमराह,शमीचा संघात समावेश


यशस्वी जयस्वालला प्रथमच एकदिवसीय संघात संधी
मुंबई :
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आता भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारताच्या संघात यावेळी मोठा बदल करण्यात आला आहे.जसप्रीत बूमराह आणि मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आला असून यशस्वी जयस्वालला प्रथमच एकदिवसीय संघात संधी मिळाली आहे
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघ पुढील प्रमाणे – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह (पहिल्या २ सामन्यांना मुकणार), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलियात जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे तो या स्पर्धेत खेळणार की नाही याची उत्सुकता सर्वांना होती. त्याचबरोबर मोहम्मद शमी फिट असूनही भारतीय संघात खेळलेला नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शमीला संधी मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मिळाली आहेत.
गौतम गंभीर यांनी भारताचे प्रशिक्षकपद सांभाळल्यापासून संघाची कामगिरी चांगली झालेली नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी ही गंभीर यांच्यासह भारतीय खेळाडूंसाठी एक मोठी संधी असणार आहे. भारताला ऑस्ट्रेलियात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आणि तो चाहत्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा प्रशिक्षक म्हणून सिद्ध करण्याची गंभीर यांच्याकडे सुवर्णसंधी असणार आहे.

Advertisement

चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात १९ फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे. पण भारताचा पहिला सामना हा २० फेब्रुवारीला होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात हा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारताचा दुसरा सामना हा पाकिस्तानशी होणार आहे, तर साखळी फेरीतील तिसरा सामना हा न्यूझीलंडच्या संघाबरोबर खेळवला जाणार आहे.

भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे. कारण भारताने आतापर्यंत फक्त एकदाच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे. २०१३ साली भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताचा २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला होता खरा, पण यावेळी इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे भारत उप विजेताच राहीला होता.भारताच्या संघासाठी आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. भारताचा एकही सामना पाकिस्तानात होणार नाही, तर भारताचे सर्व सामने यावेळी दुबईत खेळवले जाणार आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!