चीनच्या सैन्याने घेतली माघार
अजित डोवाल यांच्या वाटाघाटींना यश
नवी दिल्ली
गलवान खोऱ्यासह पूर्व लडाखमधील चार ठिकाणांहून चीनच्या सैन्याने माघार घेतली असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. गुरुवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे बैठक झाली ज्यामध्ये दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे.दोन्ही सैन्याने चार भागात माघार घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले की, दोन्ही सैन्याने चार भागात माघार घेतली आहे. सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात आणि स्थिर आहे.
पूर्व लडाखमधील लष्करी तणावामुळे चार वर्षांहून अधिक काळ द्विपक्षीय संबंध पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. ते म्हणाले की, चीन-भारत संबंधांचे स्थिरता हे दोन्ही देशांच्या दीर्घकालीन हिताचे आहे. प्रादेशिक शांतता आणि विकासासाठीही ते खूप महत्त्वाचे आहे. रशियातील बैठकीत, दोन्ही देशांनी सहमतीची अंमलबजावणी करण्यासाठी, परस्पर समज आणि विश्वास वाढवण्यासाठी, सतत संवाद राखण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण करण्यास सहमती दर्शविली आहे. दोन्ही बाजू व्यावहारिक दृष्टिकोनातून मतभेद दूर करतील, अशी आशा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जिनिव्हामध्ये चीनसोबतच्या ‘सैन्य माघारी संबंधित समस्यांपैकी 75 टक्के समस्या’ सोडवल्या गेल्या असल्याच्या एका दिवसानंतर चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याचे हे वक्तव्य आले आहे, पण मोठा मुद्दा सीमेचा आहे. डोभाल आणि वांग हे भारत-चीन सीमा संवाद यंत्रणेचे विशेष प्रतिनिधी आहेत. डोभाल आणि वांग यांच्या भेटीबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही बाजूंनी चीन-भारत संबंधांची स्थिरता दोन्ही देशांच्या लोकांच्या मूलभूत आणि दीर्घकालीन हितासाठी आणि प्रादेशिक शांतता आणि विकासासाठी योग्य असल्याचा विश्वास व्यक्त केला.

