चित्तमपल्ली यांनी निसर्ग वाचन शिकवले
सातारा नागरवाचनालयातर्फे श्रद्धांजली
सातारा
ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांना श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा यांच्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मारुती चितमपल्ली यांना जनमानसाने अरण्य ऋषी म्हणून गौरवले होते.पक्षी कोश मत्स्यकोश प्राणी कोश असे कोश त्यांनी लिहिले .सजगपणे जंगल भ्रमण करून त्यांनी निसर्ग, तिथले प्राणी यांचे जीवन अभ्यासून त्यावर मराठीमध्ये ललित लेखन व संशोधन पर लेखन केले.त्यांचा स्वतःचा वेगळावाचक वर्ग होता.
‘चकवा चांदण ‘या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी त्यांचा सगळा जीवन प्रवास वाचकांच्या समोर उलगडून दाखवला आहे.भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरविले होते.तेलगू ही त्यांची मातृभाषा होती तरीसुद्धा त्यांनी मराठी भाषेमध्ये विपुल लेखन केले.सोलापूर येथील साहित्य संमेलनामध्ये त्यांनी अध्यक्ष पद भूषवले.जंगलचं देणं , रातवा , निळावंती ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय झाली.त्यांच्या निधनाने उत्तम निसर्गवाचक लेखक हरपला आहे.असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले .
मारुती चितमपल्ली यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला यावेळी मारुती चितमपल्ली यांची ग्रंथसंपदा वाचकांच्या समोर प्रदर्शित करण्यात आली आणि वाचकांना त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.यावेळी साहित्यिक डॉ राजेंद्र माने ,वैदेही कुलकर्णी,डॉक्टर श्याम बडवे,डॉक्टर जोत्स्ना कोल्हटकर प्रा श्रीधर साळुंखे,नंदकुमार सावंत,पद्माकर पाठकजी, आनंदा ननावरे ,लता चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रूपा मुळे ,विष्णू धावडे भाग्यश्री शिंदे अन्वेषा कलेढोणकर विजय दळवी व वाचक वर्ग उपस्थित होते

