एक देश एक निवडणूक हवी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून आवाहन
नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित केलं.देशातील जनतेला संबोधित केले. आपल्या संबोधनात त्यांनी देशातील विकास, रोजगार, भविष्यातील घडामोडी,एक देश एक निवडणूक अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात घराणेशाहीवरही प्रहार केले. राजकारणातील घराणेशाही नष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कमीत कमी एक लाख तरुण-तरुणींनी पुढे यावे. यामुळे राजकारणातील घराणेशाहीला आळा बसेल. या तरुणांनी कोणत्याही पक्षात जावे. कोणतीही निवडणूक लढवावी, असेही मोदी यांनी आवाहन केले. तसेच मोदी यांनी देशात एक देश एक निवडणूक धोरण लागू करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले

मोदी म्हणाले,कोरोना काळ कोणीही विसरू शकत नाही. आम्ही या काळात देशात सर्वाधिक वेगाने लसीकरण केले. भारतात अगोदर दहशतवादी येऊन अनेकांना मारून जायचे. आता देशाची सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करते. यामुळे देशातील युवकांची छाती अभिमानाने फुगते. देशातील लोकांचे मन आज गर्वाने आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे.
दलित, पीडित, आदिवासी, झोपड्यांत राहणारे लोकच या सर्व सोईसुविधांवीना जगत होते. आम्ही प्रथामिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचाच फायदा या वंचित वर्गाला मिळाला आहे. व्होकल फॉर लोकलचा मंत्र दिला. व्होकल फॉर लोकल हा अर्थव्यवस्थेसाठी नवा मंत्र झाला आहे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हा प्रकल्प राबवला जातोय.अपारंपरिक उर्जेचा आम्ही संकल्प केला होता. नगरपालिका, राज्य, जिल्हा, केंद्र पातळीवर वेगवेगळ्या 3 लाख संस्था आहेत. मी या सर्व संस्थांना आवाहन करतो की, वर्षात आपल्या स्तरावर फक्त दोन बदल करा. कोणताही विभाग असो फक्त एका वर्षात दोन बदल करा. जनतेचं आयुष्य सुकर करणारे हे बदल हवेत. हे बदल प्रत्यक्ष राबवावेत. हे बदल प्रत्यक्षात आल्यास एका वर्षात 25 चे 30 लाख बदल घडून येतील. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल घडतील तेव्हा सामान माणसाचा विश्वास वाढेल. त्याची शक्ती राष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत होईल. त्यामुळेच या संस्थांनी बदल घडवण्यासाठी हिंमत करून पुढे यावे.
आम्ही दीड हजारपेक्षा अधिक कायदे रद्द केले आहेत. कायद्याच्या कचाट्यात लोक अडकू नयेत म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. कायदा करताना झालेल्या चुकांमुळे लोकांना छोट्या-छोट्या कारणांमुळे लोकांना तुरुंगात जायला लागायचे. आता ही परंपरा आम्ही नष्ट केली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे गुन्हेगारी कायदे होते. आता आम्ही न्यायसंहिता आणली आहे. आता दंड नव्हे तर न्यायाच्या भावनेला तयार केलं आहे.
अंतराळ क्षेत्रातही आपण आज अनेक बदल झाले आहेत. अंतराळ क्षेत्र हे आपल्या भविष्याशी जोडलेले आहे. अंतराळ क्षेत्र अनेक बंधनांनी जखडलेले होते. आता हेच बंधन मुक्त करण्यात आले आहे. अंतराळ क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स येत आहेत. अंतराळ क्षेत्र हे भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. आज प्रायव्हेट सॅटेलाईट्स, रॉकेट्स लॉन्च होत आहेत. नीती, धोरण योग्य असेल तर तसेच संपूर्ण समर्पणाची तयारी असेल तर योग्य परिणाम दिसून येतात, असे मोदी म्हणाले.
आज बदलाचा आमचा मार्ग विकासाची ब्लू प्रिंट झाली आहे. हा बदल, विकास फक्त वादविदाचा, वैचारिक लोकांच्या चर्चेचा विषय नाही. राजकारण डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे करत नाहीयोत. आमच्या नजरेत राष्ट्र सर्वप्रथम आहे. आपला देश महान व्हावा हाच उद्देश समोर ठेवून आम्ही काम करतो. बँकिंग क्षेत्राचा आज मोठा विकास झाला. अगोदर या क्षेत्राचा विकास हो नव्हता. आपल्या बँका संकटात होत्या. बँकिंग क्षेत्र मजबूत करण्यासाठी आम्ही अनेक बदल केले. जेव्हा बँक मजूबत असते तेव्हा अर्थव्यवस्थाही मजबूत होते.
