आगामी टी-20 वर्ल्डकप भारत आणि श्रीलंकेत
नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२४ चा टी-20 विश्वचषक जिंकला. भारताने विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. हा ९ वा टी-20 विश्वचषक होता.पुढचा T20 वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. आयसीसीने २०२६ च्या टी-20 विश्वचषकासाठी फेब्रुवारी ते मार्चची विंडो दिली आहे. या विश्वचषकातही एकूण २० संघ सहभागी होणार आहेत.
पुढील विश्वचषक म्हणजेच २०२६ चा टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत खेळवला जाईल. दोन्ही देश संयुक्तपणे याचे आयोजन करणार आहेत. २०२४ टी-20 विश्वचषकातील सुपर-८ संघ २०२६ च्या T20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.यजमान असल्यामुळे भारत आणि श्रीलंका वर्ल्डकपचा भाग असतील. २०२६ टी-२० विश्वचषकातील बहुतांश सामने भारतात खेळवले जातील. या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचा संघही भारतात येणार आहे. २० संघांमध्ये एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. अजून वेळापत्रक जाहीर झालेले नाही.
टी-20 विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले देश
भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, यूएसए, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड आणि पाकिस्तान.
