साहित्य माणसाला समृद्ध बनवते-वर्षा पाटोळे
नगर वाचनालयातर्फे पुस्तक दिन साजरा
सातारा
वि स खांडेकर ,अण्णाभाऊ साठे, साने गुरुजी वगैरेंचे साहित्य हे माणसाची जडणघडण करणारे असते. चांगले साहित्य माणसाला समृद्ध बनवणारे असते असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालया तर्फे पुस्तक दिन साजरा करण्यात आला.यावेळी माहिती आणि तंत्रज्ञान विषयक पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन वर्षा पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या
वर्षा पाटोळे म्हणाल्या,लहानपणी या लेखकांचे साहित्य वाचल्यामुळे मन प्रगल्भ झाले .नगर वाचालयातील विपुल ग्रंथसंपदा आणि उपक्रम अभिनंदनीय आहेत .170 वर्षापेक्षा जास्त वर्षांची जुनी परंपरा असणाऱ्या या वाचनालयात येऊन आनंद वाटला ‘
वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन वर्षा पाटोळे यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक डॉक्टर राजेंद्र माने यांनी केले
कार्यक्रमाच्या प्रारंभी काश्मीर येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार संचालक डॉक्टर श्याम बडवे यांनी मानले.
या कार्यक्रमाला पद्माकर पाठकजी,गौतम भोसले,नरेंद्र जाधव, पत्रकार अनील वीर ,ग्रंथपाल रूपा मुळे,भाग्यश्री शिंदे,अन्वेषा कलेढोणकर,वेदांत कारवे,विष्णू धावडे,विजय दळवी वगैरे मान्यवर उपस्थित होते