व्हॉट्सॲप बंद होणार ?


दिल्ली हायकोर्टात कंपनीचा भारत सोडून जाण्याचा इशारा
नवी दिल्ली
सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग आणि चॅटिंग ॲप, व्हॉट्सॲपने भारत सोडण्याचा पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली. व्हॉट्सॲपने दिल्ली हायकोर्टात भारत सोडण्याची भाषा वापरली.आय टी ऍक्टमधील काही नियमांवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरु आहे.त्यावेळी व्हॉट्सॲपच्या वकिलाने एनक्रिप्शन तोडण्यास सांगितले गेले तर भारतात काम बंद करावे लागेल, असे सांगितले.
दिल्ली हायकोर्टात व्हॉट्सॲप आणि मूळ कंपनी मेटा यांनी धाव घेतलेली आहे. याचिकावर सुनावणी सुरु आहे. यामध्ये आय टी ऍक्टमधील नियमांना या मोठ्या ब्रँडने आव्हान दिले आहे. सुनावणीवेळी नियमांच्या आधारे एंड-टू-एंड एनक्रिप्शन करण्यास सांगितल्यास भारतातील कामकाज गुंडाळण्याची भाषा व्हॉट्सॲपने केली आहे.
सोप्या शब्दात व्हॉट्सॲपला आय टी ऍक्ट 2021 हा चाचक ठरत आहे.या कायद्यान्वये, कोणता मॅसेज पहिल्यांदा कोणी पाठवला, त्याची माहिती काढण्यासाठी, युझर्सच्या मॅसेजचा धांडोळा घेण्यासाठी, माग काढण्यासाठी व्हॉट्सॲपवर दबाव आहे. व्हॉट्सॲप असे करेल तर त्याला सर्व युझर्सचे मॅसेज ट्रेस करावे लागतील. याविषयीचे सर्व रेकॉर्ड त्यांच्याकडे अनेक वर्ष जतन करुन ठेवावा लागेल.त्यामुळे एंड-टू-एंड एनक्रिप्शन संपेल. केंद्र सरकारने आय टी ऍक्ट 2021 हा कायदा 21 फेब्रुवारी 2021 रोजी आणला होता.सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला या नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
दिल्ली हायकोर्टात सुनावणीदरम्यान आज व्हॉट्सॲपने बाजू मांडली. ‘आम्हाला मॅसेजची संपूर्ण साखळी जतन करावी लागणार आहे. आणि आम्हाला माहिती नाही की कोणता मॅसेज ट्रेस करावा लागणार आहे. याचा अर्थ मॅसेज डिक्रिप्ट करण्यासाठी कोट्यवधी मॅसेज आम्हाला कित्येक वर्ष जतन करावे लागतील.’ जर एनक्रिप्शन तोडण्यास सांगितले, तर आम्ही देश सोडून जाऊ, असे व्हॉट्सॲपने सांगितले. व्हॉट्सॲपच्या मते, जगात त्यांना कोणत्याच देशाने अशा प्रकारचा नियम लागू केलेला नाही.
याचिकेवर पुढील सुनावणी 14 ऑगस्ट रोजी होईल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!