पोस्टाची ‘ग्राम सुरक्षा योजना’
चांगली गुंतवणूक करण्यासाठी पर्याय
नवी दिल्ली
चांगली गुंतवणूक करायची असेल किंवा बचत करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी एक ‘ग्राम सुरक्षा योजना’ आहे जी तुमच्या वृद्धापकाळात आधार बनू शकते.पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनापैकी एक आहे.या योजना जोखीममुक्त गुंतवणुकीच्या अंतर्गत येतात कारण योजनांमधील ठेवी बाजाराच्या जोखमीच्या अधीन नाहीत. गुंतवणुकीवर जोखीममुक्त परतावा मिळत असल्याने लाखो लोक पोस्ट ऑफिस योजनांना प्राधान्य देतात.
19 ते 55 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करू शकतात. गुंतवणुकीची रक्कम 10,000 ते 10 लाख रुपये वार्षिक असू शकते. गुंतवणूक मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर केली जाऊ शकते.या योजनेत, गुंतवणूकदारांना वयाच्या 80 व्या वर्षी बोनससह परतावा मिळेल. जर एखाद्या व्यक्तीचे वय 80 वर्षापूर्वी निधन झाले तर त्याच्या कायदेशीर वारसाला ही रक्कम मिळेल.
ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक सुरू केल्यानंतर चार वर्षांनीच कर्जाची सुविधा मिळू शकते. पाच वर्षांनंतर गुंतवणुकीवर बोनसचा दावा केला जाऊ शकतो. तुम्ही गुंतवणूक सुरू केल्यानंतर तीन वर्षांनी गुंतवणूकही सरेंडर करू शकता. म्हणजे तुम्ही गुंतवणूक थांबवू शकता.जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाख रुपयांची ग्राम सुरक्षा योजना खरेदी केली तर त्याला 55 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 1,515 रुपये प्रीमियम भरावा लागेल, म्हणजे सुमारे 50 रुपये प्रतिदिन.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लाभार्थीला 80 वर्षे पूर्ण झाल्यावर पॉलिसीची संपूर्ण रक्कम म्हणजेच 35 लाख रुपये सुपूर्द केले जातील
