25 जून ‘संविधान हत्या दिवस
केंद्र सरकारने जारी केली अधिसूचना
नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी संसदेच्या सभागृहात मोठी घोषणा केली. आता दरवर्षी 25 जून रोजी देशात ‘संविधान हत्या दिन’ साजरा केला जाईल. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामुळेच काँग्रेसच्या तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने केलेल्या या कृत्याची सर्वांना वारंवार आठवण करून देण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. अमित शाह यांनी त्यांच्या अधिकृत X हँडलद्वारे याची घोषणा केली.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यघटना बदलल्याचा आणि भाजपाचा राज्यघटना बदलण्याचा डाव आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाने वारंवार केला होता. 400 चा आकडा पार करण्याच्या सरकारच्या घोषणेवर काँग्रेसने फक्त संविधान बदलण्यासाठी 400 जागांची गरज असल्याचे म्हटले होते. आता काँग्रेसच्या या मोहिमेला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.
अमित शाहांनी x अकाऊंटवरून केली घोषणा:’संविधान हत्या दिन’ लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याची अमर ज्योत तेवत ठेवण्यासाठी कार्य करेल, जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही. अशी पोस्ट अमित शाहांच्या अधिकृत अकाऊंटवरून करण्यात आली आहे.
देशात आणीबाणी लादणे ही काँग्रेस पक्षाची देन आहे. जेपी आंदोलन आणि इंदिरा गांधी यांच्या विरोधात देशात निर्माण झालेले वातावरण दाबण्याच्या उद्देशाने आणीबाणी जाहीर करण्यात आली. त्यावेळी देशातील सर्व बड्या नेत्यांना सुमारे दीड वर्ष तुरुंगात टाकण्यात आले आणि देशातील सर्व मोठ्या वृत्तपत्रांचा ताबा सरकारने घेतला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या परवानगीशिवाय वर्तमानपत्रात कोणतीही बातमी प्रसिद्ध होत नव्हती. आताही आणीबाणीचा काळ देशाच्या राजकारणातील सर्वात वाईट काळ म्हणून पाहिला जातो.
